श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये बीएससी. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

0
68

उमरगा:  शहरातील भारत शिक्षण संस्था संचलित, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय  येथील विज्ञान विभागाच्या वतीने बी. एस.सी. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि.7रोजी कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले , तर् प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले , विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ.व्ही.एस.सूर्यवंशी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या मनोगतामध्ये डॉ.विलास इंगळे यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी योग्य महाविद्यालयाची निवड करून वेगवेगळ्या आणि आपल्या आवडत्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवावे कारण हे युग स्पर्धेचे असून या स्पर्धेमध्ये आपण टिकण्यासाठी आपणास अभ्यास आणि चिकाटी ठेवावी असे आव्हान केले.यानंतर डॉ. व्हि.एस.सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयीन जीवन हेच आपल्या भविष्य घडवण्याचे,जीवनास आकार देण्याचे केंद्र असते त्यातून विद्यार्थी घडत असतो.आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी , मित्र,शिक्षक हे कायम जीवनभर स्मरणात राहतात. हे महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचे काम करत आले आहे. निरोप समारंभ हा औपचारिक असून माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे महत्वाचे घटक असतात यावरच आपल्या महाविद्यालयाचे यश अवलंबून असते. यामुळे त्यांचे महाविद्यालासाठीचे योगदान महत्वाचे असते.यापुढील काळातसुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम माजी विद्यार्थ्यांनी आयोजित करावेत असे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले .महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन नोकरी ,पदव्युत्तर शिक्षण आणि व्यवसाय यासंबंधी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाने वेगवेगळ्या योजना,कार्यक्रम याद्वारे विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.याचा विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायासाठी नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमासाठी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. व्ही डी देवरकर,डॉ. डी. व्हि. माने, डॉ. रेवते एस.एस., डॉ. गायकवाड व्हि.एम., डॉ. विष्णु शिंदे, प्रा.मुगळे योगेश, प्रा. अतुल बिराजदार, प्रा. नितनवरे आर.आर., डॉ.निर्मळे एम. एस., महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.त्यानंतर कु. चांदणी बनसोडे, कु. ऋतुजा कोळी,कु. पूजा माने व करण पोतदार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा कोळी व आभार करन पोतदार यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here