इकबाल मुल्ला
लोहारा:- उन्हाळ्यात गर्मी पासून बचाव करण्यासाठी नागरिक मोकळी हवा लागेल अशा ठिकाणी झोपणे पसंत करतात. याच संधीचा चोरटे गैर फायदा घेवून घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे सध्या चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. लोहारा पोलीसांनी कार्यक्षेत्रात गस्त वाढवली आहे. नागरिकानीही आपले मोल्यवान दागिने व रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे गर्मीने उकडून निघावे लागत आहे. स्लॅब दिवसभर गरम झाल्याने रात्री घरात चांगलाच धगाटा निर्माण होतो. त्यामुळे घरात झोपणे तर लांबच साधे बसणे ही अवघड होवुन जाते. पत्र्याच्या घराची ही हीच परिस्थिती आहे. त्यातच पंखा, कुलर, एसी बंद पडणे, विद्युत पुरवठा खंडीत होणे या अडचणींमुळे नागरीक उन्हाळ्यात घराबाहेर हवा खेळती राहील अशा ठिकाणी, गच्चीवर, बाहेर पटांगणात झोपणे, घरात झोपले तर दरवाजा उघडा ठेवणे पसंत करतात. या संधीचा फायदा घेऊन चोरटे घरातील मौल्यवान वस्तू, रोख रक्कमेची चोरी करण्यासाठी सरसावले आहेत. उन्हाळा चालु झाल्यापासून चोरट्यांनी अनेक घरांवर डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक नागरीकांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूं,रोख रक्कम यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.
—————————————
अशी घ्या काळजी
* घरात मोठ्ठी रक्कम ठेवू नका.
*मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बॅंक लॉकरचा वापर करावा .
*घराचा दरवाजा बंद ठेवावा. शक्य असल्यास दरवाजाला वगळ लावावी.
*बाहेर झोपताना मौल्यवान वस्तू परिधान करून झोपू नये.
*घरात असलेली रोकड सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री करावी.
——————————–
अलार्म कुलूप होवू शकतो उत्तम पर्याय
——————————–
सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. आपल्या घरातील चोरी होवू नये यासाठी अलार्म लॉकचा वापर करणे आवश्यक आहे.सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या कुलुपाला उघडण्याचा अथवा तोडण्याचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजतो. त्यामुळे घरातील नागरीक जागे होतात. त्यामुळे अशा अलार्म लॉकचा वापर केल्यास कांहीं अंशी का होईना चोरीस आळा बसेल यात शंका नाही.
———————————–
लोहाऱ्यात झाली होती अशीच चोरी
—————————-
लोहारा शहरातील गवंडी प्लॉटींग येथील रहीवासी असलेल्या ज्योत्स्ना किरण मोरे यांच्या घरातील पंखा खराब झाल्याने त्या घरातीलच खोलीत झोपल्या होत्या. चोरट्यांनी याचा गैरफायदा घेतला. घरात प्रवेश करीत कपाळाचे टाळे तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती. पप्पू भरारे यांनी घरात गरम होत असल्याने खिडकी ठेवून झोपी गेले असता चोरट्याने खिडकितुन हात घालून मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. या घटना प्रातिनिधिक स्वरूपात असल्या तरी अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
————————————————
पोलीस प्रशासन चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीसांकडून नागरिकांना अपेक्षा आहेत. आम्ही गस्त वाढवली आहे. पोलीस प्रशासन चोरांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे.परंतू चोरी होवू नये यासाठी नागरिकांनी ही जागरूक राहून काळजी घ्यायला हवी — ज्ञानेश्वर कुकलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,लोहारा.