उमरगा येथे जलतारा प्रकल्प तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

0
69

 

उमरगा :- शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील  सभागृहात दि. 24 एप्रिल रोजी  जिल्हाधिकारी धाराशिव व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जलतारा प्रकल्पाची कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेचे उद्घाटन उमरगा – लोहारा तालुक्याचे आमदार  प्रवीण स्वामी  यांच्या हस्ते करण्यात आले. जलतारा प्रकल्पाचे जनक प्रा. डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी जलतारा प्रकल्पाचे महत्त्व विश्लेषण केले.यामध्ये खालावत चाललेली पाण्याची पातळी व बागायत क्षेत्र यांचे सुधारणा करण्याबाबत सांगितले . जलतारा प्रकल्पाची साधी-सोपी, सुटसुटीत व कमी खर्चाची पद्धती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प एकरी एक केल्यास पाण्याच्या पातळीत निश्चित वाढ होते हे उदाहरणासह सांगितले. जलतरा प्रकल्पाचा दुसरा एक फायदा म्हणजे ज्या जमिनी चिबड झालेले आहेत अशा जमिनीमध्ये सुद्धा हा प्रकल्प राबवल्यास सदरची जमीन पाण्याचा निचरा होऊन पिकाऊ होऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर  एन एस जोशी यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी  उमरगा चेे तहसीलदार  गोविंद येरमे, अमोल मोरे अध्यक्ष भारत शिक्षण संस्था उमरगा ,प्रा. डॉ. संजय आस्वले प्राचार्य श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय , सचिन दुबे समन्वयक टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन, सुरेश दाजी बिराजदार चेअरमन भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमरगा तालुका कृषी अधिकारी   डी. बी. रितापुरे  यांनी केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटवारी, मंडळ कृषी अधिकारी मुरूम यांनी केले यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. तदनंतर मौजे तलमोड येथे  गुंडाजी बापू मोरे यांच्या शेतामध्ये प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांच्या उपस्थितीत जलतारा प्रकल्प प्रात्यक्षिक पूर्ण केले व सर्व शेतकऱ्यांचे शंका समाधान केले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनीही एकरी एक प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here