उमरगा :- येथील सामाजिक कार्यकर्ते सुमीत कोथिंबीरे यांना राज्यातील प्रतिष्ठीत गणला जाणारा शांतीदूत परिवाराचा राज्यस्तरीय ” सेवा रत्न” पुरस्कार नुकताच उमरगा येथे प्रदान करण्यात आला.प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, मुंबई ही संस्था गेले 30 वर्षापासून देश पातळीवर शैक्षणिक, विषमुक्त शेती, बेरोजगार मुक्त भारत, डिजीटल शिक्षण, व्यवसायीक शिक्षण या विषयावर काम करीत आहे. प्रथम संस्थेच्या लातूर व किल्लारी शाखेच्या माध्यमातून उमरगा व लोहारा तालुक्यातील सुमारे सतरा हजार सुशिक्षीत बेरोजगार युवकांना संपर्क करून त्यातील सुमारे तीन हजार सहासे युवकांना इलेक्ट्रिक, सोलार, वेल्डिंग, बांधकाम, नर्सिंग आदि कौशल्य विषयक कोर्सचे मोफत दिड ते दोन महिन्याचे प्रशिक्षण देवून पुणे, हैदाबाद, संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीत नौकरी मिळवून दिली . तालुक्यातील बेरोजगार मुक्तीसाठी केलेल्या अशा अनमोल कार्यासाठी शांतीदूत परिवाराने ” सेवा रत्न” पुरस्कार देवून सन्मान केला आहे.यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील नेक्सलाईट अशा संवेदनशील भागातून अनेक बेरोजगार युवकांना समुपदेशन करून किल्लारी येथे आणून त्यांना प्रशिक्षण देऊन नौकरी मिळवून दिली या कार्यासाठी प्रथम संस्थेने राष्ट्रीय पातळी वरील “बेस्ट मेंटॉर इन इंडिया 2022” हा पुरस्कार देऊन गौरव केला. उमरगा येथे नुकताच आमदार प्रविण स्वामी , निवृत्त पोलिस महासंचालक डॉ विठ्ठलराव जाधव ,उमरगा जनता बँकेचे चेरमन शरण पाटील, शिवसेना उपनेत्या सौ आस्मिता गायकवाड, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमाकांत बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांच्याअध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथम संस्थेचे वरिष्ट अधिकारी सदाशिव साबळे, शिलरत्न शेळगे , इरमाइल तंटे , संतोष गुंजोटे , बालाप्रसाद पाचंगे आदिनी कोथिंबीरे यांचे अभिनंदन केलेआहे