अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

0
87

 

उमरगा : उमरगा — लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे व नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करुण नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि .२७ रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले .

 

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा लोहारा तालुक्यातीत दि. 20/05/2025 पासुन दि.27/05/2025 पार्यन्त सातत्याने विविध मंडळात मान्सुन पुर्व झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरात पाणी घुसुन नुकसान पडझड झालेली आहे. अशा नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावेत. व तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी . या अतिवृष्टीने उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे, फळबागांचे, नुकसाग्रस्त घरांचे त्वरीत पंचनामे करुण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी . अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .   निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड, उमरगा राष्ट्रवादी शहराध्यक्ष शंतनू सगर, उमरगा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, श्रीराम जगदाळे, विकास साळुंखे, महेश कदम, सादिक जेवळे , शहाबाज शेख, सुरेश भोसले, आदींच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here