शेतकरी हिताची आणखीन एक मागणी पूर्णत्वास, आता नाममात्र 500 रुपयांमध्ये शेती वाटणीची दस्त नोंदणी होणार — आ.अभिमन्यु पवार

0
222

लोहारा :- शेतकरी भावंडांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर रेडीरेकनरच्या 1% रक्कम स्टँप ड्यूटी भरावी लागते, स्टँप ड्यूटीचा बोझा टाळण्यासाठी बहुतांश शेतकरी भावंडे नोटरी करुन शेतीची वाटणी करतात, कालांतराने वाटणीवरुण वाद विकोपाला जातात. त्यामुळे शेतकरी भावंडांना त्यांच्या शेतीच्या वाटणीची दस्त नोंदणी करायची असल्यास नाममात्र 500 रु. किंमत आकारण्यात यावी अशी विनंती औशाचे आ.अभिमन्यु पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना केली होती. मला शेतकरी बांधवांना सांगताना अत्यानंद होत आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत “शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा” ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here