औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

0
50

धाराशिव:-  राज्यातील शेतकऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पती लागवड ही एक नविन आणि लाभदायक संधी उपलब्ध झाली आहे.केंद्र सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक सन २०२५-२६ पासून नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.केंद्र शासनाने या घटकासाठी वार्षिक कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा मोठा लाभ मिळणार आहे.या योजनेअंतर्गत जेष्ठमध,शतावरी, कालीहारी,सफेद मुसळी,गुग्गुळ, मंजिष्ठा,कुटकी,अतिस,जटामासी, अश्वगंधा,ब्राम्ही,तुलसी,विदारीकंद, पिंपळी,चिराटा व पुष्करमूळ यासारख्या औषधी वनस्पतींसाठी प्रति हेक्टर १.५० लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.तसेच गुलाब,रोझमेरी,निशिगंध, चंदन,दवणा,लॅव्हेंडर यांसारख्या महाग सुगंधी वनस्पतींसाठीही हे सहाय्य लागू होणार आहे.या योजनेअंतर्गत लागवड साहित्य व INM/IPM चा खर्च दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार असून,प्रत्येक लाभार्थ्यास दोन हेक्टर पर्यंत लाभ घेता येणार आहे.सर्वसाधारण क्षेत्रामध्ये ४० टक्के आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये ५० टक्के इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.मागील काळात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान ८१८.२३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती आणि रु. ४१५.१२ लक्ष अनुदान वितरित करण्यात आले होते. मात्र २०२०-२१ पासून ही योजना बंद करण्यात आली होती. आता ही जबाबदारी आयुष मंत्रालयाकडून कृषि मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.याशिवाय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देखील औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले असून अर्जुन,असान,अशोका,बेहडा, हिरडा,बेल,टेटू,डिकेमाली,रक्तचंदन, रिठा,लोध्रा,आइन,शिवन,गुग्गुळ, बिब्बा व करंज या १६ औषधी वृक्षांना अनुदान देण्यात येणार आहे.औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदानित देण्यात येते.यामध्ये जेष्ठमध/मुलेठी, शतावरी,कलाहरी/ कळलावी, सफेद मुसळी,गुग्गुळ,मंजीष्ठा,कुटकी, अतिस,जटामाशी,अश्वगंधा,ब्राह्मी, तुलसी,विदाराकंद,पिंपळी,चिराटा, पुष्करमूळ यासाठी प्रती हेक्टरी १.५० लक्ष रुपये २ हप्त्यामध्ये देण्यात येतात.तसेच गुलाब,रोझमेरी, निशिगंध,जिरेनियम,कॅमोमाइल, चंदन,दवणा,जाई,लव्हेंडर या सुगंधी वनस्पतींसाठी १.२५ लक्ष रुपये प्रति हेक्‍टरी अर्थसहाय्य दिले जाते.तर पामरोसा,गवती चहा,तुळस,व्हेटिव्हर जावा,सिट्रोनेला,गोड तुळशीपत्र या इतर सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाते. सर्व इच्छुक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकांतर्गत अर्ज सादर करावा.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here