लोहारा:– भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या नेतृत्वाच्या निद्रेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध मंडळामध्ये नवीन मंडळ अध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी या नियुक्त्त्यांची अधिकृत घोषणा केली. उमरगा ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षस्थानी सिध्देश्वर माने, मुरुम मंडळाच्या अध्यक्षस्थानी निरंजानंद अंबर, धाराशिव ग्रामिण पुर्व मंडळाचे अध्यक्ष निळकंठ पाटील, धाराशिव ग्रामिण पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिल भुतेकर, कळंब शहर मंडळ अध्यक्ष मकरंद पाटील, कळंब ग्रामिण पुर्व मंडळ अध्यक्ष अरुण चौधरी, कळंब ग्रामिण पश्चिम मंडळ अध्यक्ष दत्ता साळुंके, वाशी मंडळ अध्यक्ष राजगुरु कुकडे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व मंडळ अध्यक्षांना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणी जनसंपर्क वाढविण्यासाठी जबाबदार्या देण्यात आल्या असुन त्यांच्या माध्यमातुन भाजपाचे बळ वाढविले जाईल, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला. सर्व नविन अध्यक्षांनी पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहचवुन विश्वासार्ह नेतृत्व उभे करावे, पक्ष संघटनेता अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी परिश्रम घ्यावेत असे आवाहानही भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले. या निवडीमुळे धाराशिव भारतीय जनता पार्टी चे संघटन अधिक भक्कम होण्यास हातभार लागेल, असा पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास आहे