उमरगा :— तालुक्यातील पेठ सांगवी येथील ग्रामपंचायत अंतर्गत महिला केंद्र येथे विकसित भारत कृषि संकल्प अभियान अंतर्गत दि.10 जून रोजी खरीप हंगाम पूर्व तयारी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील शास्त्रज्ञ डाॅ.भगवान अरबाड साहेब ,डॉ.जाधव साहेब ,डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथील डॉ.आर. के.सिंग साहेब , डॉ.नीलेश गायकवाड साहेब यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सिराज शेख, माजी सरपंच . गणेश पाटील उपस्थित होते. यावेळी खरीप हंगाम पूर्व बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सोयाबीन ,तूर ,उडीद व इतर खरीप या पिकांच्या बाबतीत कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे, आंबा लागवड व इतर खरीप पिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच बीजप्रक्रिया, उगवण क्षमता, गोगलगाय निर्मूलन याचे प्रात्यक्षिक,उप कृषी अधिकारी एल.व्हि.फडणीस साहेब,सहाय्यक कृषी अधिकारी .ए.एम.बलसुरे यांनी करून दाखवले . तसेच फडणीस साहेब यांनी उपस्थित महिलांना कृषि विभागाच्या वतीने विविध योजना बद्दल सविस्तर माहिती दिली.यावेळी माजी सरपंच.गणेश पाटील प्रगतशील शेतकरी यांनी सोयाबीन पीक उत्पादन वाढ याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच.समीर सय्यद तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी राष्ट्रीय नैसर्गिग शेती मिशन या योजने विषयी सविस्तर माहिती दिली व उपस्थित शेतकरी यांना प्रत्येकानी किमान एक एकर तरी सेंद्रिय शेती करावी.असे आवाहन केले.डॉ.आर.के सिंग साहेबांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत नैसर्गिक शेती बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी जीवामृत,बीजामृत याबदल माहिती दिली.यावेळी सरपंच.सिराज शेख ,माजी सरपंच.गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य .संजय माळी, शेतकरी संजय पाटील, धनराज पाटील, जुबेर शेख, सिद्धेश्वर सुभेदार, भगवान सुभेदार,प्रतिज्योत गर्जे पाटील,(सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक) ,उमेद कृषी व्यवस्थापक श्री.सचिन सोनवणे सर व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षक सौ.रूपाली कोकाटे , उमेद कृषी सखी / सीआरपी सौ.रूपाली महाजन , सौ.प्रभावती महाजन शेतकरी पुरुष व महिला शेतकरी या मोठ्या संख्येने उपस्थित होते.