उमरगा :– केंद्र शासनाच्या नविन धोरणानुसार ई-नाम राष्ट्रीय कृषि बाजार या नविन प्रणालीमुळे शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा होणार असुन , व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषि मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांचे उमरगा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आवाहन.
केंद्र शासानाचे राष्ट्रीय कृषि बाजार ई-नाम योजनेमध्ये उमरगा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवड झाल्यामुळे त्या अनुषंगाने बाजार समितीतील परवानाधारक आडते व्यापारी व अधिकारी/कर्मचारी तसेच कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव यांच्यासाठी उमरगा कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहात बुधवार (ता. 11) केंद्र शासनाच्या नविन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषि बाजार) योजने बाबत संबंधीत माहिती देण्यासाठी मार्गदर्शपर प्रशिक्षणवेळी रंगनाथ कटरे बोलल होते ते म्हणाले की, शेतीमालास योग्य भाव शेतीमालाचे वगौकरण (ग्रेडींग) योग्य हाताने व मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे या योजने अंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदारांना व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे .त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळवता येणार आहे भविष्यात गावातील शेतीमालास राष्ट्रीय स्तरावरही बाजार पेठ उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रक्कमांबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी ई-नाम साठी उमरगा बाजार समितीकडे नोंद करणे गरजेचे आहे नोंदणीसाठी आधारकार्ड, बैंक पासबुक, झेरॉक्स व मोबाईल नंबर अनिवार्य आहे तसेच आपल्या मोबाईलव्दारे गूगल प्ले स्टोअर मधुन ई-नाम ॲप डाउनलोड करून पण स्वतः आपली नोंदणी करु शकता असे ही रंगनाथ कटरे यांनी स्पष्ट केले.
समितीचे सचिव सिध्दप्पा घोडके म्हणाले की, केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेचा शेतकरी व व्यापारी बांधवांना फायदा होणार आहे ई-नाम अंतर्गत बाजार आवारात होणाऱ्या शेतीमालाच्या लिलावाची प्रक्रिया सर्वप्रथम ई-नाम प्रक्रियेव्दारे राबविणार आहे . यासाठी बाजार समितीच्या एकुण 26 व्यापाऱ्यांना ई-नाम योजनेमध्ये समाविष्ठ केले असून ई-नाम मध्ये एकूण ।।32 शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे असे घोडके यांनी स्पष्ट केले.यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती बसवराज कस्तुरे, उपसभापती विजयकुमार माने, संचालक प्रल्हाद काळे, सुभाष गायकवाड, मारुती पाटील, राजेंद्र तळीखेडे, विक्रम इंगळे, बालाजी महावरकर गुंजोटी वि. का. सो. चे. सचिव बालाजी पोतदार, संचालक किसन पाटील, अण्णाराव सुर्यवंशी व व्यापारी धनराज हिरमुखे, सुभाष गिरीवा, प्रकाश सुर्यवंशी व बाजार समितीचे सचिव सिध्दप्पा घोडके व सर्व कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.