उमरगा :– ज्ञानज्योती सामाजिक बहुउददेशीय संस्था, उमरगा यांच्या वतीने मागील १५ वर्षांपासुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती पुरस्कार 2025 चे मानकरी जाहीर झाले आहेत.
*१) प्रा.शिवमूर्ती भांडेकर (शिक्षण व साहित्य) मुळ गाव आलुर ता.उमरगा जि.धाराशिव* — भुषवलेली पदे – संचालक, श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगा व श्री.विठठलसाई सह. साखर कारखाना लि. मुरूम , कथा लेखन, काव्य लेखन, शोध लेखन, वळंबा या आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आजतागायत विविध संस्थांकडुन पुरस्काराने सन्मान, सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज.
*२) प्रा.कांतराव सोमवंशी, (प्रसिद्ध बासरीवादक) मुळ गाव – आष्टा का. ता.लोहारा,*– १९६२ साली दिल्ली येथे झालेल्या युवक महोत्सवात मराठवाडा विद्यापीठाचा प्रतिनीधी म्हणुन सहभाग व बासरी वादन. १९८३ मध्ये आकाशवाणी केंद्रावर कलावंत म्हणुन निवड, १९८३ ते २०१२ सलग २८ वर्षे आकाशवाणी वरून बासरीवादन कार्यक्रम प्रसारित, महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांत बासरीवादनाचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत.
*३) श्री.योगीराज माने (ज्येष्ठ कवी व साहित्यिक) मुळ गाव तुगाव ता.उमरगा* — जलसंपदा खात्यातुन उपकार्यकारी अभियंता म्हणुन निवृत्त, आजतागायत १० वेळा अखील भारतिय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रीत कवी म्हणुन सहभाग, इटीव्ही मराठी च्या साहित्य दरबार कार्यक्रमात सन २००८ ते २०१० या कालावधीत कवी म्हणुन सहभाग, विविध चित्रपटांसाठी गीत लेखन, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, लातूर व अध्यक्ष शब्दपंढरी प्रतिष्ठाण लातूर या पदांवर सध्या नियुक्त आहेत. आजवर विविध पुरस्कारांनी गौरव.
*४) रणजीतसिंह ठाकूर (क्रीडा – राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू), रा.उमरगा*– १९९५ सालापासुन २००० पर्यंत राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये खेळले. पंजाब, हरियाणा, दिल्ली, केरळा, शिमला, चंदीगड, याठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दरबारा सिंग यांच्याकडुन दिल्ली येथील सामन्यानंतर विशेष गौरव.
*५) देवीसिंग भीमसिंग राजपूत (ज्येष्ठ पत्रकार) रा.येणेगुर ता.उमरगा* – लोकमत मध्ये गेल्या ३५ वर्षांपासुन पत्रकारिता, २५ वर्षांपासुन अखील भारतीय क्षत्रीय राजपुत संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव म्हणुन कार्यरत, येणेगुर परिसरातील सर्वपरिचीत व्यक्तिमत्व. मागील ४२ वर्षांपासुन आरोग्य सेवेत सक्रिय. लोकमतच्या माध्यमातुन जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न, दै.लोकमत कडुन दिले जाणाऱ्या विभागीय पुरस्काराने दोनदा सन्मानित.
*६) श्री.गोविंद पवार (प्रगतशील शेतकरी), रा.सास्तुर ता.लोहारा,* – सास्तूरसारख्या ग्रामीण भागात शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग. उपक्रमशील शेतकरी. शेतामध्ये आधुनिक पद्धतीने पेरू लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत.
*७) माधव मारूती जाधव, (आदर्श सरपंच) रा.व्हंताळ ता.उमरगा,*- २०२१ साली व्हंताळ गावचे सरपंच म्हणुन निवड, लहानपणापासुन सामाजिक कार्याची आवड, व्हंताळ येथे वन विभागाच्या साथीने सुमारे १०८००० वृक्षांची लागवड, गावामध्ये प्रत्येक गल्ली, घरासमोर फळझाडांची लागवड व जोपासना, संत गाडगेबाबा जिल्हा विशेष पुरस्काराने सन्मानीत, आर.आर.आबा स्मार्ट व्हीलेज म्हणुन गावाची निवड. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य. जास्तीत जास्त ग्रामस्थांना वैयक्तीक लाभाच्या योजना मिळवुन देण्यावर भर.
*८) सौ.वर्षा किशोर माने (महिला गृह उद्योजिका) रा.दाबका ता.उमरगा*- दाबका ता.उमरगा या छोटयाच्या गावात राहुन बचत गटाच्या माध्यमातुन आपल्या घरीच शेवया मशीन, पापड मशीन, पिठाची गिरणी, मिरची कांडप आदी घरगुती उद्योग चालवितात. मागील १२ वर्षांपासुन त्या हे गृह उद्योग चालवितात.वरील ८ मान्यवरांना यंदाचा ज्ञानज्योती पुरस्कार जाहीर झाला असुन, येत्या ६ जुलै रोजी उमरगा शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित ज्ञानज्योती सोहळ्यात यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती ज्ञानज्योती सामाजिक बहुउददेशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले, उपाध्यक्ष विजयकुमार वडदरे व सचिव प्रदीप मदने यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे दिली आहे.