उत्पादन शुल्कची हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त; २४० गुन्ह्यांची नोंद करून २२६ आरोपींना अटक
धाराशिव :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -२०२४ ची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे.आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क धाराशिव कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री इत्यादीवर पूर्ण प्रतिबंध करण्याकरिता कठोर कारवाई करण्यात येत आहे.१५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई करण्यात आली.यामध्ये ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ आरोपींना अटक केली.तर १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत कारवाया करून ४७ गुन्हे नोंदवून ३९ आरोपींना अटक केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक विभाग धाराशिव व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी जिल्हयामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण ८ गुन्हयांची नोंद करून ७ आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये देशी दारु १०.८० ब.लि विदेशी दारु १०.४४ ब लि.हातभट्टी दारु ९५ ब.लि.,ताडी १५० लिटर व रसायन १७०० लि.( एकूण अंदाजित किंमत र१ लक्ष १ हजार ९७५ रु.) जप्त करण्यात आलेली आहे .निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भूम विभाग व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी भुम,परांडा व वाशी या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण ६ गुन्हयांची नोंद करून ६ आरोपीला अटक केली.या कारवाईत देशी दारु ९.७२ ब.ली व विदेशी दारु २१.४२ ब.लि.,हातभट्टी दारु ६५ लिटर व ताड़ी १४५ लिटर ( एकूण अंदाजित किंमत ३४ हजार ५२५ रुपये) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क धाराशिव विभाग व अधिनस्त कर्मचारी यांनी धाराशिव व कळंब या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण१४ गुन्हयांची नोंद केली.१३ आरोपीला अटक केली आहे . या कारवाईमध्ये हातभट्टी दारु 50 व . ली.व हातभटी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे रसायन ५९०० ब . लि.,ताडी ९० लिटर देशी दारु २९.९२ ब.ली. व विदेशी दारु १९.५२ ब.लि ( एकूण अंदाजित किंमत ९५ हजार ८८० रुपये ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे.दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका तलमोड विभाग व अधिनस्त कर्मचारी यांनी उमरगा तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये ४ गुन्हयांची नोंद केली असून ३ आरोपीला अटक केली आहे.
या कारवाईमध्ये देशी दारु १२.९६ व.ली.हातभट्टी दारु १८० व लि.आणि रसायन १ हजार लिटर ( एकूण अंदाजित किंमत ६१ हजार ३४० रुपये ) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे.निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क तुळजापूर विभाग व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी तुळजापूर व उमरगा या तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण १४ गुन्हयांची नोंद केली असून १३ आरोपीला अटक केली आहे.या कारवाईमध्ये बिअर १४.३० ब.ली.विदेशी दारु १८.७२ व लि.हातभट्टी दारु ५१५ लिटर व रसायण ५०० लिटर ( एकूण अंदाजित किंमत ९५ हजार ८८० रुपये) जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे.निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग,धाराशिव,निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क धाराशिव विभाग,धाराशिव तसेच निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्रमांक २ विभाग,सोलापूर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,कुईवाडी विभाग , सोलापूर यांनी १५ नोव्हेंबर रोजी भातुंबरे तांडा व यमाई तांडा,ता .बार्शी,जि.सोलापूर या ठिकाणी केलेल्या सामुहिक कारवाईत एकूण ४ गुन्हयांची नोंद केली आहे.या कारवाईमध्ये हातभट्टी दारु निर्मिती करण्याकरिता लागणारे रसायण ४६०० लिटर ( एकूण अंदाजित किंमत १ लाख ७४ हजार ३०० रुपये ) जप्त करुन नष्ट करण्यात आले आहे .निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग,धाराशिव, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क धाराशिव विभाग,धाराशिव तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक विभाग,लातुर व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,लातूर क्रमांक १,२ व ३ विभाग,लातूर यांनी १६ नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्हयातील जागजी तांडा व तावरजखेडा तांडा या ठिकाणी केलेल्या सामुहिक कारवाईत एकूण ६ गुन्हयांची नोंद केली असून ३ आरोपींना अटक केली आहे.या कारवाईत हातभट्टी दारु निर्मिती करण्याकरिता लागणारे रसायन ३९०० लिटर व ५० लिटर हातभट्टी दारु ( एकूण अंदाजित किंमत १ लाख ५२ हजार २०० रुपये ) जप्त करुन नष्ट करण्यात आले आहे .अशाप्रकारे १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये या विभागातील अधिकारी यांनी केलेल्या कारवायात एकूण ४७ गुन्हे नोंद करुन ३९ आरोपींना अटक केली आहे.या कारवायामध्ये हातभट्टी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे ९१०० लि.रसायन,९०५ लि.हातभट्टी दारु,६३.४ लि.देशी दारु,७०.१ लि. विदेशी दारू,३८५ लि. ताडी व १४.३ लि.बिअर जप्त करण्यात येऊन नष्ट केली.याची अंदाजित किंमत ५ लक्ष ७८ हजार ४३५ रुपये इतकी आहे. १५ ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यापासून १६ नोव्हेंबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण २४० गुन्हयांची नोंद करुन २२६ आरोपींना अटक केली आहे. एकूण १४ वाहनांसह ४६ लक्ष ६४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री इत्यादींवर कठोर कारवाई करण्यात येत असून अवैध मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स / ढाब्याबाबत माहिती असल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फी क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटस् अॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.असे राज्य उत्पादन शुक्लचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी कळविले आहे.