उमरगा :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग कडून उमरगा तालुक्यात सध्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. सदर बंधारे हे श्रमदानातून बांधण्यात येत असून त्यास तांत्रिक मार्गदर्शन कृषि विभाग करताना दिसून येत आहे
अशाच संकल्पनेतून जकेकुर येथे तालुका कृषी अधिकारी उमरगा डी.बी.रितापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत
यावेळी तालुका कृषी अधिकारी रितापुरे यांनी वनराई बंधाऱ्याचे महत्व पटवून देताना सांगितले की, सिंचन प्रकल्पात पाणीसाठा असला तरी प्रकल्प परिसरातील खालच्या बाजूने वाहणारे पाणी नदी ,नाले व वड्यातून वाहणारे पाणी वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवले जाते. या साठवलेल्या पाण्याचा वापर रब्बी हंगामातील पिकासाठी संरक्षित पाण्याचा स्त्रोत निर्माण होतो तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढते.वनराई बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या शेतीस फायदा होईल.
सदर कामामध्ये मंडळ कृषी अधिकारी ए.बी.पटवारी ,कृ.प. एल. व्हीं.फडणीस,कृषी सहाय्यक गुडूसाहेब शेख,आविष्कार भालेराव,अतुल गायकवाड,रमेश पाटील,अमोल बलसुरे ,बाळासाहेब खंडाळकर, शरद अरिकर,पी.व्ही.काळे,एस.एस.कुलकर्णी,बी. ए.जाधव,रवी पाटील, विलीन साखरे, नीलकंठ लामजने , मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सचिन गायकवाड , मुजक्किर पटेल,भास्कर बिराजदारआणि शेतकरी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.