मुरूम :- मुरुम येथील श्री. विठ्ठलसाई साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ सुरु असून या हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाचे पहिल्या पंधरवाडयाचे बीलाचा हप्ता प्र.मे.टन रु.२७००/- प्रमाणे सर्व संबंधित शेतकर्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तरी ऊस उत्पादक शेतकरी बांधवानी बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम घ्यावी. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे. अशी विनंती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांनी केली आहे.