उमरगा :- तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकऱ्यांना यापुढे दिवसा पुर्ण क्षमतेने वीज देण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दि.1 जानेवारी रोजी 2 मेगावॅट क्षमतेच्या सोलार प्लॅटची पाहणी करण्याकरीता आल्याप्रसंगी दिले.
दि.1जानेवारी रोजी सकाळी 11वा. धाराशिव चे जिल्हाधिकारी डाॅ.सचिन ओंबासे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 24 डिसेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन केलेल्या सोलार प्लांटला भेट देण्यासाठी तसेच परीसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्या करीता आले होते. तसेच उद्घाटन केलेल्या प्लॉन्ट च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली जात आहे का नाही हे पाहण्यासाठी आले होते. यासंदर्भात शेतकऱ्यां सोबत चर्चा केले असता दिवसा वीज पुरवठा केला जात नाही असे उत्तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. महावितरणच्या कर्मचाऱ्याला विचारले असता नारंगवाडी फिटरला अधिकचा लोड असल्याने ही वीज पोहोचू शकत नसल्याचे अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी अगोदर एकफिटर चालवण्याचे आदेश दिले.यापुढील काळात नारंगवाडी येथील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळले असे आदेश डाॅ.ओम्बासे यांनी महावितरण च्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना दिले.
पवनचक्की व सोलार या परिसरात जास्त प्रमाणात उभारले जात असून शेतकऱ्यांना मनोरा टावर उभारणीचे पैसे कुठे कमी कुठे जास्त दिले जात असून,संबंधित कंपन्या दंडमशाहीचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर मनमानी करून मनोरा टावर उभारणीचे काम करत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्याकडे याप्रसंगी केल्या. नारंगवाडी गावातील प्रगतीशील शेतकरी विठ्ठल चिकुंद्रे यांनी जिल्हाधिकारी ओंबासे यांना निवेदन देऊन सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, उमरग्याचे तहसीलदार गोविंद ऐरमे,सरपंच शेखर घंटे,महावितरणचे अधिक्षक अभियंता धाराशिवचे आडे , कार्यकारी अभियंता काळे,सोलार कंपनीचे राजु मिनीयर, मंडळअधिकारी पी.जी.कोकण,ग्रामसेवक जगदीश जाधव,पोलिस पाटिल हेमंतराव पाटील, उपसरपंच कुमार पवार, नानाराव भोसले,अमोल चव्हाण,लिंबराज सोमवंशी,किशोर सांगवे, संजय पवार,पिंटू जाधव, भारती महाराज,जयहिंद पवार आदी शेतकरी,महावितरणचे कर्मचारी,व अधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन विठ्ठल चिंकुद्रे यांनी केले.